मंडळातील सर्व कार्यकर्त्यांती श्री गणपतीवर दृढ श्रद्धा असून सर्वच कार्यकर्त्यांची एक इच्छाशक्ती होती की मंडळाच्या जागेवर भविष्यात छोटे का होईना परंतु गणपतीचे मंदिर बांधायचे या इच्छाशक्ती नुसार म्हणतात ना इच्छा असेल तर मार्ग दिसेल अगदी त्यापद्तीने सर्व प्रश्न मार्गी लागले मग तो जागेचा असो किंवा भांडवलाचा असो जसे काही प्रत्यक प्रश्नला देवानेच सात दिली. मंदिर होण्यापाठी जणू काही श्रींचीच इच्छा. मग वास्तुशास्त्रज्ञ करपे साहेब यांच्यमार्गदर्शना खाली मुहूर्त ठरला.
बांधकामाचा शुभारंभ वैशाख शु.२ अक्षय तृतीया शनिवार दि. २२/०४/२०२३ रोजी सकाळी ११ वा. या शुभमुहूर्तावर सातारा जिल्हा खासदार व सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल मा. श्री. श्रीनिवास पाटीलसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला . त्याप्रसंगी उपस्थित सातारा जिल्हा पदवीधर मतदान संघाचे अध्यक्ष मा. श्री अभिजीत सोमदेसाहे,टाळगावचे माजी सरपंच मा.श्री अण्णासाहेब जाधव, मा. श्री उदय पाटीलसाहेब (आबा),मा. श्री दिपकदादा लोखंडे साहेब, गोटेवाडी गावचे सरपंच मा.डॉ विलास आमलेसाहेब,गोटेवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य मा. श्री अनिल जाधवसाहेब,गोटेवाडी विकास सेवा सोसायटीचे सदस्य श्री अजितदादा मोहीतेसाहेब, मा.श्री सखाराम काटेकरसाहेब, मा. श्री संजय तोडकरसाहेब, गणेशवाडी गावचे सरपंच मा. श्री मानेसाहेब आणि गोटेवाडी गावचे नागरिक व मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इच्छापूर्ती श्री गणेश मंदिराचे ध्येय म्हणजे श्री गणरायावरील अढळ श्रद्धा, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी जपत धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जोपासणे. आमची दृष्टी म्हणजे मंदिराला श्रद्धा, संस्कार, समाजसेवा आणि एकतेचे प्रेरणादायी केंद्र बनवून भावी पिढीपर्यंत भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा पोहोचवणे.
श्री गणरायावरील श्रद्धा, भक्ती आणि सेवाभाव जपत धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक परंपरा जोपासणे, समाजोपयोगी उपक्रमांद्वारे जनजागृती करणे आणि प्रत्येक भाविकाला आध्यात्मिक समाधान व सकारात्मक प्रेरणा देणे हे आमचे ध्येय आहे.
इच्छापूर्ती श्री गणेश मंदिर हे श्रद्धा, संस्कार, समाजसेवा आणि एकतेचे प्रेरणास्थान बनवून पुढील पिढीपर्यंत भारतीय संस्कृती, धार्मिक परंपरा आणि सेवाभावी कार्याचा समृद्ध वारसा पोहोचवणे ही आमची दृष्टी आहे.
इच्छापूर्ती श्री गणेश मंदिर व मंडळ गेली २५ वर्षे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. उत्कृष्ट नियोजन, समाजसेवा, धार्मिक परंपरा आणि कार्यकर्त्यांच्या समर्पणामुळे मंडळाने हजारो भाविकांचा विश्वास संपादन केला आहे.
असे म्हणतात मूर्ती लहान पण कीर्ती महान याप्रमाणेच मंडळामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या ईतपतच मोजकेच कार्यकर्ते असून देखील मंडळाचे कार्य हे उत्तम नियोजनावर आजवर उल्लेखनीय प्रकारे चालू आहे.
मंडळाचे डेकोरेशन हे पंचक्रोशी मध्ये नावलौकिक आहे.या डेकोरेशनच्या माध्यमातून प्रतिवर्षी समाजाकरता एक सामाजिक संदेश देणारे अगदीच कमी खर्चामध्ये डेकोरेशन केले जाते.यामध्ये आजवर शेतकऱ्याचे आत्महत्या थांबवणेबाबत जनजागृती करणे, बळीराजा व त्याच्या कार्याला बळकटी देण्याकरिता बैलगाडी देखावा,मुखे प्राण्याचे जीवन -हाती देखावा, वृक्षारोपण काळाची गरज,प्रदूषण टाळा व विजेची बचत करा. श्रीकृष्ण जन्म कथा - वासुदेव प्रकृती आणि अष्टविनायक दर्शन इत्यादी डेकोरेशनचे उत्तम प्रकारे सादरीकरण मंडळाने आजवर केलेले आहे.
मंडळाचे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरामध्ये छोटे गणपती बसविले जात होते परंतु मंडळाच्या स्थापनेच्या वर्षापासून कमी कार्यकर्त्याच्या अभावी घरातील सर्वांचे गणपती बसवणे बंद करून व एकाच ठिकाणी सार्वजनिक मंडळातील गणपती बसवून त्याची सेवा केली जाते.
गणपती मंडळ स्थापनेपासून मंडळातील सर्वच महिलावर्ग व पुरुष यांना आजवर कोणत्याही कार्यामध्ये कमतरता न भासल्याने मंडळातील प्रत्येक कुटुंबामध्ये दोन ते तीन महिला व पुरुष प्रत्येक वर्षी गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत ११ दिवस उपवास धरत असतात.
असे म्हणतात ना एखाद्या पुरुषाच्या यशाच्या पाठीमागे घरातील स्त्रीचा पाठिंबा असतो.याचप्रमाणे आपल्या मंडळाच्या उत्कृष्ट कार्यापाठीमागे मंडळातील सर्वच लहान व थोर मंडळातील महिला वर्गाचा तसेच माहेरवासीनी महिलांचाही नेहमीच पाठिंबा लाभलेला आहे. कारण मंडळाचे कार्य करत असताना प्रत्येक कार्यामध्ये तसेच गणपती मिरवणूक असो किंवा मंडळाचा कोणताही कार्यक्रम असो त्या वेळी पूर्ण विभागांमध्ये रांगोळी काढायची असो या महिला नेहमीच या कार्यासाठी अग्रेसर असतात.
मंडळाची गणेश विसर्जनाची मिरवणूक प्रतिवर्षी सांप्रदाय पद्धतीने केली जाते.यामध्ये आजवर भजनी मंडळ, शाही मिरवणूक, धनगरी ढोल, लेझीम पथक, शिवकालीन दांडपट्टा, झांज पथक इत्यादी प्रमाणे केली असून यामध्ये महिला व पुरुष वर्गाचा मोठा सहभाग असतो.
मंडळाने आजवर फक्त गणपती बसवणे व विसर्जन करणे एवढेच कार्य न करता आपण ही समाजासाठी काहीतरी देणे लागतो या उद्देशाने आजवर मंडळाच्या वतीने शाळेतील गरजू मुलांना वह्या वाटप, गरजू मुलांना एक वर्षासाठी पालकत्व स्वीकारणे, कोरोना कालावधीत अत्यावश्यक वस्तूचे किट वाटप, गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी बसण्याच्या व्यवस्थेकरिता बाक देणे, गावातील गरजू व्यक्तींना अत्यावश्यक वस्तूंचे किट वाटप, गावच्या वेशिवरती रस्त्याच्या दुथर्फी बाजूस वृक्षारोपण करणे,ग्रामस्थाकरिता अष्टविनायक तीर्थयात्रेचे उत्तम नियोजन करणे असे अनेक समाजोपयोगी विविध प्रकारचे कार्यक्रम राबवलेले असते.
मंडळातील सर्वच कार्यकर्ते यांच्यामध्ये कोणती ना कोणती कला व कौशल्य दडलेले आहे. त्याप्रमाणेच ज्याच्या अंगी जे कौशल्य आहे. त्याला मंडळातील त्याचप्रमाणे कार्याचे नियोजन दिले जाते. याचा आजवर मंडळाला उत्तम प्रकारे परतावा मिळाला आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता आपली कला मंडळाच्या कार्या मध्ये दाखवत असतो त्यामुळे मंडळाचे कार्य अतिशय उत्तम प्रकारे पार पडले जाते.

“We rely on Sarika Vegetables and Fruits Trading for our restaurant supply. Their consistency, pricing, and freshness are unmatched. Truly dependable.”

“Ordering is super easy through WhatsApp, and the delivery team is always punctual. Great value for money and great customer support.”

“They offer the best wholesale service we’ve experienced—clean packing, fresh produce, and very competitive rates. Perfect for retailers like us.”


“Always fresh and delivered on time! The quality of fruits and vegetables is consistently excellent. Highly reliable service for weekly home needs.”